“नाशिक कृषी बाजार समिती – 2025 मधील संपूर्ण माहिती (Mandi Bhav, Shatkarayanchi Suvidha, Market History)”
Nashik Market: महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा ३ नंबर चा जिल्हा आहे , ज्याची २०२५ सालानुसार, एकूण लोकसंख्या सुमारे ७६.४ लाख (७.६४ दशलक्ष) इतकी आहे. आणि नाशिक जिल्ह्यात सुमारे १२ ते १३ लाख शेतकरी कुटुंबं आहेत. नाशिक मध्य मुख्यता द्राक्ष , कांदा आणि टोमॅटो (Nashik Grapes, Onion, Tomato Market)ची पिके घेतली जातात . भाजीपाला पण भरपूर प्रमाणात असतो , परंतु द्राक्ष , कांदा आणि टोमॅटो हे तीन ठोस पिके असल्याने ह्याचे उत्पादन नाशिक मध्ये सर्वात जास्त असते . इतर मका , गहू , ज्वारी , बाजरी हे कडधान्य पण बरेच प्रमाणात लावले जाते . नाशिक मध्ये पाणी मुबलक प्रमाणात आहे त्यामुळं नाशिक मध्ये जवळ जवळ सर्वच प्रकारची शेती केली जाते . ह्यामुळं नाशिक हे भारतातील एक सुपीक आणि उपजाऊ क्षेत्र आहे .

Nashik Agricultural Market ची स्थापना कशी झाली?
नाशिक मध्ये शेतकरी संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं नाशिक ला शेती मार्केट ची खूप गरज भासू लागली . कारण शेतकरी माल तर मोठ्या प्रमाणात तयार करत होते – पण तो विकण्यासाठी हवी तशी बाजारपेठ उपलब्द नव्हती , आणि नाही शेतीकारी हिताला जोडून काही व्यवस्था होती . जे काही होत ते इंग्रजांची शाळा होती – मन्हजे त्यांनी जे काही नियम शेती विषयी तैयार केले होते त्या नुसार शेतकरण्याची केवळ लूटमार चालू होती . १९४७ ला भारत आजाद झाला , त्यानंतर ५ वर्षांनी – २१ /११ /१९५२ ला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली . आज आपण जी दिंडोरी रोड ला बाजार समिती बघतो आहे – तीच हि . त्यावेळेस काही सहकारी चळवळ वाले लोकांनी एकत्र येत ह्या बाजार समिती ची स्थापना केली . सुरवातीला १ – २ लाकडाचे शेड सोडले तर तसं काही खास नव्हतं . तो काळ तुम्ही पण डोळ्यासमोर आणू शकता कि कसा असेल तेव्हा . पण जशी तशी समिती ची स्थापना झाली आणि लोकांना आपल्या शेती माला साठी एक हक्काचा ठिकाण उपलब्द झालं . एक असं ठिकाण जिथं ते आपल्या मला साठी एक योग्य किंमत मागू शकता – जात कोणी त्यांना फसवत असेल तर ते वरिष्ठ अधिकाऱयांकडे न्याय मागू शकता , हळू हळू नाशिक मधील लोकांना नाशिक बाजार समिती आपली वाटू लागली , नाशिक सह आस पास चे लोक पण मार्केट मध्ये आपला माल घेऊन येऊ लागले , आणि आणलेल्या मालाला चांगला भाव मिळवू लागले. व्यापारी वर्गासाठी पण बाजार समिती एकदम उत्तम झाली – जेणेकरून ते पण एकाच ठिकाणी एकापेक्षा अनेक माल बघू शकता आणि हवा तो विकत घेऊ शकता .

आज कशी आहे नाशिक बाजार समिती ?
१९५२ ला सुरू झालेली नाशिक बाजार समिती आज अगदी प्रशस्त बनली आहे . आज तिथे सर्व सुविधा आहे , जेवढ्या प्रमाणात शेतकरी वर्ग माल विकण्यासाठी मार्केट मध्ये येतो – तेवढ्याच प्रमाणात माल विकत घेण्यासाठी व्यापारी वर्ग पण असतो . त्यामुळं नाशिक मार्केट मध्ये आलेला माल – जास्त करून विकलाच जातो . आज जर आपण गेलात तर फक्त नाशिककर च नाही तर दुसऱ्या जिल्हातील लोक पण आपला माल विकण्यासाठी नाशिक मार्केट ला येतात . अगदी एक फळांच्या एका पाटी पासून ते टोमॅटो च्या ट्रक खाली होतात . आज हि बाजार पेठ दिंडोरी रोड , पंचवटी नाशिक ३ मध्य स्तिथ आहे . हीच std कोड ०२५३ असा आहे . नाशिक शहरातील सर्व मेन रोड दिंडोरी रोड ला येऊन मिळतात – जेणेकरून मार्केट मध्ये तुम्ही शहराच्या कोणत्या पण दिशेनं येऊ शकतात . शासनाने ह्या पर्यायी मार्गाचे व्यवस्थित नियोजन केले आहे . आज नाशिक बाजार समिती मध्ये दिवसाला काही करोडांची उलाढाल होते . नाशिक बाजार समिती पहाटे ४ वाजे पासून ते रात्री २ वाजे पर्यंत चालू असते(Nashik farmer’s market timing) . असंख्य गाड्या येतात खाली होतात – आणि आल्या मार्गी जातात . आज नाशिक बाजार समिती शेतकऱ्यांसाठी एक हक्काची बाजार पेठ बनली आहे .
Nashik Farmer साठी बाजार समिती मध्ये कोणत्या सुविधा आहेत?
- लिलाव गृह
- लिलाव ओटा
- उपहारगृह
- जनावरे शेड
- तारेचे कुंपण
- संगणक
- दवाखाना
- ड्रेनेज
- पिण्याचे पाणी
- वीज विद्युत व्यवस्था
- इलेक्टॉनिक वजनकाटे
- पुरुष स्वच्छतागृह
- अंतर्गत रस्ते
- महिला स्वच्छतागृह
- लाउड स्पिकर
- कार्यालय इमारत
- पार्कींग व्यवस्था
- पोलीस चौकी
- शेतकरी निवाससेल हॉल
- शेतकरी बाजार शॉपिंग सेंटर
- दूरध्वनी टि.व्ही.
- टॉयलेट
- भाजीपाला मार्केट
- पाण्याचा कुलर
- पाण्याचा पंप
- पाणी पुरवठा
- पाण्याची टाकी
- जनावरांसाठी पाण्याचे हाळ
- वजनकाटा
- विहिर
Nashik Mandi Bhav 2025 – कोणते पिके सर्वाधिक येतात?

जस कि मी सुरवातीला सांगितलं नाशिक मध्य मुख्यता द्राक्ष , कांदा आणि टोमॅटो ची पिके घेतली जातात . भाजीपाला पण भरपूर प्रमाणात असतो , परंतु द्राक्ष , कांदा आणि टोमॅटो हे तीन ठोस पिके असल्याने ह्याचे उत्पादन नाशिक मध्ये सर्वात जास्त असते . इतर मका , गहू , ज्वारी , बाजरी हे कडधान्य पण बरेच प्रमाणात लावले जाते . त्याच बरोबर आंबा, चिक्कू, डाळिंब, टरबूज, बटाटा, भोपळा, डांगर, फ्लॉवर, गवार, घेवडा, घोसाळी (भाजी), कोबी, विड्ची पाने, फ्लावर ह्यसारखे शेतीमाल विकण्यासाठी नाशिक मार्केट मध्ये यतात . तस आजून छोटे मोठे खूप सारे पिके – फळ आहे ते पण मार्केट मध्ये विकण्यासाठी येतात .
FAQ – शेतकरी लोकाना पडणारे प्रश्न
नाशिक बाजार समिती कधी सुरू झाली?
-: २१ नोव्हेंबर १९५२ रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली.
Nashik Mandi Bhav कसे तपासावे?
-:रोजच्या दरांचे फोटो व माहिती तुम्ही आमच्या वेबसाईटवर पाहू शकता(www.nashikmandibhav.com) किंवा Nashik APMC च्या संकेतस्थळावर.
नाशिक बाजारात कोणते पिके जास्त विकली जातात?
-: द्राक्ष, कांदा, टोमॅटो हे प्रमुख आहेत. त्यानंतर बटाटा, डाळिंब, गहू, भाजीपाला इ. येतात.
आमची वेबसाइट तुमची कशा प्रकारे मदत करेल ?
Nashikmandibhav.com ह्या वेबसाइट पर नाशिक मधील रोजच्या रोज भावांचे फोटो आपल्याला बघायला भेटील . हे सर्व फोटो आम्हाला मार्किट कमिटी मधून भेटतात. तुम्ही रोजच्या रोज मार्किट भाव बघून अंदाजा लावू शकता की काल मार्किट ची काय स्तिथि होती , आज काय असेल ? आणि भविष्यात कोणत्य मलाला किती डिमांड असेल ? ह्या सर्व गोष्टी तुम्ही आपल्या साईट वर बघू शकता . आपले whatsapp ग्रुप पण आहे , जर तुम्हाला जॉइन होयच असेल तर ७७७ ०० ५२ ५६२ ह्या नंबर वर मेसेज करा .
Leave a Reply